भारतातील 28 राज्य व राजधानी (State and Capital in Marathi)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील सात क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. आशिया खंडात असलेल्या या देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 करोड आहे, जी जगात दोन नंबर च्या स्थानावर आहे. भारत हा खूप मोठा देश आहे, सरकारच्या दृष्टीने एकच विस्तृत भारत चालवणे शक्य नाही, त्यासाठी भारताला विविध राज्यात विभाजले आहे.

(State and Capital in Marathi) भारतात एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. इतिहासात इंग्रजांनी भारतात प्रांतांची निर्मिती केली होती, परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यावर यामध्ये खूप बदल करण्यात आले. आजच्या या लेखात आपण भारतातील 28 घटक राज्य, त्यांच्या राजधान्या State and Capital in Marathi पाहणार आहोत.

भारतातील 28 राज्य व राजधानी (State and Capital in Marathi)

आताच्या स्थितीत भारतात एकूण 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 10 डिसेंबर 1953 रोजी फाजल अली यांच्या नेतृत्वाखाली भाषावार प्रांतरचना आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगानुसार सुरुवातीला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले गेले होते. कालांतराने त्यात बदल होऊन आत्ता 28 राज्य आहेत, ते खालीलप्रमाणे-

क्रमांकराज्यराजधानीस्थापना
1आंध्र प्रदेशअमरावती१ ऑक्टो. १९५३
2आसामगुवाघाटी१ नोव्हें. १९५६
3बिहारपाटणा१ नोव्हें. १९५६
4कर्नाटकबेंगलोर१ नोव्हें. १९५६
5केरळतिरुवनंतपूरम१ नोव्हें. १९५६
6मध्य प्रदेशभोपाळ१ नोव्हें. १९५६
7ओडिसाभुवनेश्वर१ नोव्हें. १९५६
8राजस्थानजयपूर१ नोव्हें. १९५६
9तामिळनाडूचेन्नई१ नोव्हें. १९५६
10उत्तर प्रदेशलखनऊ१ नोव्हें. १९५६
11पश्चिम बंगालकोलकाता१ नोव्हें. १९५६
12महाराष्ट्रमुंबई१ मे १९६०
13गुजरातगांधीनगर१ मे १९६०
14नागालँडकोहिमा१ डिसेंबर १९६३
15पंजाबचंदिगढ१ नोव्हें. १९६६
16हरियाणाचंदिगढ१ नोव्हें. १९६६
17हिमाचल प्रदेशशिमला२५ जाने. १९७१
18मेघालयशिलॉंग२१ जाने. १९७२
19मणिपूरइंफाळ२१ जाने. १९७२
20त्रिपुराआगरतला२१ जाने. १९७२
21सिक्कीमगंगटोक२६ एप्रिल १९७५
22अरुणाचल प्रदेशइटानगर२० फेब्रु. १९८७
23मिझोरामऐझवाल२० फेब्रु. १९८७
24गोवापणजी३० मे १९८७
25छत्तीसगडरायपूर१ नोव्हें. २०००
26उत्तरांचलडेहराडून९  नोव्हें. २०००
27झारखंडरांची१५ नोव्हें. २०००
28तेलंगणाहैद्राबाद२  जून २०१४

31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन करण्यात आले. विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. यामुळे भारतातील राज्यांची संख्या २९ ची २८ झाली.

आपल्याला आजचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

‘भारतातील 28 राज्य व राजधानी (State and Capital in Marathi)” हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment